Operation Sindoor : देशाच्या रक्षणासाठी सीमेवर जाणाऱ्या जवानासाठी प्रत्येक नागरिकाचे उर अभिमानाने भरून येते. याच जवानांना जेव्हा वीर मरण येते देशातील प्रत्येक नागरिकाच्या डोळ्यात अश्रू तरळते. देशवासियांची जर ही अवस्था असेल तर त्यांच्या घरच्यांची काय अवस्था होत असेल याची कल्पना न केलेली बरी.
राजस्थानातील झुंझुनू जिल्ह्यातील रहिवासी असलेले भारतीय हवाई दलाचे जवान सुरेंद्र कुमार पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात देशासाठी हुतात्मा झाले. त्यांचे पार्थिव गावात आणताच संपूर्ण परिसरात शोकाकुल वातावरण पसरले होते, पण सर्वात हृदयस्पर्शी क्षण तेव्हा होता जेव्हा हुतात हुतात्मा पतीच्या शवपेटीजवळ बसलेली त्याची पत्नी रडत म्हणाली, ‘प्लीज उठ जा यार…
पत्नीच्या या भावनिक आक्रोशाने सर्वांचे हृदय पिळवटून निघाले. त्याचे दुःख शब्दात व्यक्त करणे केवळ अशक्य आहे. तिने कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल की तिला अशा प्रकारे तिच्या जोडीदाराला अंतिम निरोप द्यावा लागेल. तू लवकरच परत येशील असे वचन दिले होतेस, आता मी कसे जगू? त्यांच्या पत्नीच्या या दयनीय रडण्याने देशातील प्रत्येक नागरिकाला हादरवून टाकले. डोळ्यात अश्रू आणि मनात अभिमान घेऊन तिने तिच्या पतीला शेवटचा सलाम केला. संपूर्ण गाव त्या शूर सैनिकाच्या हौतात्म्याबद्दल शोक व्यक्त करत होते. भारत माता की जय आणि सुरेंद्र कुमार अमर रहेंच्या घोषणांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
बालपणापासूनच लष्कराची ओढ
सुरेंद्र कुमारला लहानपणापासूनच सैन्यात भरती व्हायचे होते आणि देशासाठी काहीतरी करण्याचे त्याचे स्वप्न होते. आपले स्वप्न पूर्ण करताना हुतात्मा झाले, असे गावकरी आणि कुटुंबातील सदस्यांनी सांगितले. या हल्ल्यामुळे देशाचा आणखी एक शूर सैनिक हिरावून घेतला. सुरेंद्र कुमार सारख्या नायकांमुळेच आपला देश सुरक्षित आहे. त्यांचे हौतात्म्य नेहमीच लक्षात राहील. देश अशा शूर पुत्रांना कधीही विसरू शकत नाही. हे केवळ एका कुटुंबाचे दुःख नाही तर संपूर्ण देशाचे दुःख आहे.