---Advertisement---
पाचोरा (प्रतिनिधी) : भारत देशामध्ये बांगलादेशी नागरिकांचे अनधिकृत होत असलेले स्थलांतर हे भारत देशाच्या सार्वभौमत्व व सुरक्षेला आव्हान आहे. यामध्ये अनधिकृत बांगलादेशी, रोहिंग्या मुसलमान अवैधरीत्या राहत असल्याचे निदर्शनास येत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात यांची संख्या असण्याची शक्यता आहे. भविष्यात धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी कारवाई अथवा यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी येथील सराफ असोसिएशनतर्फे पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
सोने-चांदी व्यवसायामध्ये पश्चिमबंगाल येथील कारागीर काम करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आहेत. यापैकी बरेच बंगाली कारागीर गेल्या अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे काम करत असून, ते येथील रहिवासी देखील आहेत. हस्तशिल्प सुवर्णकार कारागीर वेल्फेअर असोसिएशन ही संस्था सोने-चांदी कारागिरांची रजिस्टर संस्था आहे.
---Advertisement---
आमच्या निदर्शनास आले आहे की काही पश्चिमबंगालमधील कारागीर हे कुठल्याही पुराव्याशिवाय संपूर्ण महाराष्ट्रात काम करत आहेत व यातील ९५% बंगाली कारागीर हे भाडेकरू म्हणूनच आहेत, यांचे कुठलेही रेकॉर्ड पोलिस व प्रशासनाकडे नाही. यातील काही बाल कामगार तर आहेस त्याच बरोबरीने ते अनधिकृत बांगलादेशीय असल्याचे निदर्शनास येत आहे, त्यांच्याकडे ओकरतीचे कुठलेही पुरावे नाही.
तसेच विचारणा केल्यास त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे येतात. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात सुरक्षिततेच्या कारणावरुन हस्तशिल्प सुवर्णकार कारागीर वेल्फेअर असोसिएशन मार्फत संपूर्ण महाराष्ट्र पोलीस प्रशासनाला विनंती करण्यात येत आहे की, या सर्व बंगाली कारागिरांचे आधार कार्ड व इतर रहिवासी पुरावे तपासून जर कोणी बांगलादेशी व्यक्ती सापडल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी सराफ असोसिएशनचे किरण देवरे, निखिल पिंपळगावकर,कमलेश सोनार,राजेंद्र चिंधुशेठ सोनार,मिलिंद सोनार आदी उपस्थित होते.