वरणगावजवळ विचित्र अपघात; पिकअपचालकाचा जागीच मृत्यू, पहाटेची घटना

---Advertisement---

 

जळगाव : भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरालगत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर वेस्टर्न हॉटेलसमोर मध्यरात्री तीन वाहनांचा विचित्र भीषण अपघात झाला. यात एक जणाचा जागीच मृत्यू झाला, तर रिक्षाचालकासह तिघेजण जखमी झाले. याबाबत ट्रकचालकाविरुद्ध वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनुसार, ट्रक क्रमांक एमएच-३७-टी-६७७१ वरील चालक अजहरखान सखाउल्लाखान (रा. समतानगर, कारंजा लाड, जि. वाशीम) हा भुसावळकडून वरणगावकडे भरधाव वेगाने जात असताना वेस्टर्न हॉटेल समोरून निघणाऱ्या पिकअप एमएच-१९ सीवाय-४५७६ ला जोरदार धडक दिली. या धडकेत पिकअपचालक राजू गुलाब ओतारी (रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) यांचा जागीच मृत्यू झाला.

---Advertisement---

 

या ट्रकने पुढे जाऊन रिक्षा क्रमांक एम एच१९- सीडब्ल्यू २९५० लादेखील मागून जोरात धडक दिली. या धडकेत रिक्षा सुमारे ५० मीटर अंतरापर्यंत ओढली गेली. रिक्षाचालकासह त्यामध्ये बसलेले गणेश तळेले व त्यांचा मुलगा ऐश्वर्य गणेश तळेले, मुलगी सारिका गणेश तळेले (वय २०) जखमी झाले. त्यांना तातडीने १०८ अॅम्ब्युलन्सद्वारे भुसावळ येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

घटनास्थळी पोलीस तातडीने दाखल झाले. पिकअपमधील मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला आहे. याप्रकरणी रिक्षाचालकाने दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक चालक अजहर खान सखाउल्ला खान ( रा. समतानगर, कारंजा लाड, जि. वाशीम) याच्याविरोधात वरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास स.पो.नि. आमितकुमार बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. कॉ. प्रेमचंद सपकाळे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---