महिलेचा पाठलाग, हात पकडत केला विनयभंग, तिघांवर गुन्हा दाखल

भुसावळ : रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेचा तीन नराधमांनी हात पकडत विनयभंग केला. भुसावळ शहरातील शांती नगरात ३० रोजी सकाळी १० वाजता हा प्रकार घडला. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात ३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ शहरातील एका भागात २१ वर्षीय महिला ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ही महिला ३० रोजी सकाळी १० वाजता शहरातील शांतीनगर परिसरातून पायी जात होती. दरम्यान, तेजस सपकाळे, कुणाल हटकर आणि एक अनोळखी इसम यांनी तिचा पाठलाग केला. एवढेच नाही तिच्या अंगावरील कपड्यांची ओढता करून तिचा विनयभंग केला.

या प्रकरणी महिलेने भुसावळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार दुपारी ३ वाजता तेजस सपकाळे, कुणाल हटकर दोन्ही रा. भुसावळ आणि एक अनोळखी व्यक्ती अशा तीन जणांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार मोहम्मद अली सय्यद हे करीत आहे.