---Advertisement---

१ जुलैपासून तिकिटे बुक करू शकणार नाहीत ‘ही’ लोक, रेल्वेने बदलले नियम

---Advertisement---

Indian Railway IRCTC : भारतीय रेल्वेतून दररोज कोट्यवधी प्रवासी प्रवास करतात. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून आरक्षण तिकिटांमध्ये फसवणूक झाल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने आरक्षण तिकिट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. यामुळे आता प्रवाशांची फसवणूक करणारे दलाल तिकिटे बुक करू शकणार नाहीय.

सूत्रानुसार, भारतीय रेल्वेला अनेक महिन्यांपासून काही लोकांनी बनावट आयआरसीटीसी अकाउंट तयार केले आहेत. हे लोक या अकाउंटद्वारे काळ्या रंगात तिकिटे बुक करतात. यासोबतच, काउंटरवर दलाल सक्रिय असतात, जे काळ्या रंगात कन्फर्म तिकिटे बुक करतात, अश्या तक्रारी रेल्वे प्रशासनाला दाखल झाल्या आहेत. त्यानुसार भारतीय रेल्वेने आयआरसीटीसी अॅप आणि काउंटरवरून आरक्षण तिकिटे बुक करण्याचे नियम बदलले आहेत.

एकूणच फसवणूक आणि बनावटगिरी रोखण्यासाठी भारतीय रेल्वेने एक मोठे पाऊल उचलले आहे. नवीन नियमानुसार, आता आयआरसीटीसी खाते आधार कार्डशी लिंक करावे लागेल, त्यानंतरच तुम्ही या अ‍ॅपच्या मदतीने तिकिटे बुक करू शकाल, अथवा बुक करू शकणार नाहीत. दरम्यान, हा नियम १ जुलै २०२५ पासून देशभरात लागू होईल. त्यामुळे, तुम्ही वेळेत तुमचे आयआरसीटीसी खाते आधार कार्डशी लिंक करून घ्या.

काउंटरवरून तिकिटे बुक करण्याचेही बदलले नियम


आयआरसीटीसी अ‍ॅपसोबतच, भारतीय रेल्वेने काउंटरवरून तत्काळ तिकिटे बुक करण्याचे नियमही बदलले आहेत. आता तुम्ही फॉर्मवर जो मोबाईल नंबर टाकाल, त्या नंबरवर ओटीपी येईल. त्यानंतरच तुमचे तिकीट बुक केले जाईल. रेल्वेनुसार, या नियमामुळे तिकिट फसवणुकीला आळा बसणार आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment