Raksha Khadse : आजची गर्दी बघून विरोधकांना धक्काच बसला असेल, नक्की काय म्हणाल्या रक्षा खडसे ?

जळगाव : आजची गर्दी बघून विरोधकांना धक्का बसला असेल हे नक्की. कारण  एवढ्या उन्हात आपण सर्वांनी मला आणि स्मिताताईंना आशीर्वाद देण्यासाठी आला आहात. समोरचे आज कितीही मुद्दे घेऊन सांगत असतील की दहा वर्षांत आम्ही काही केलं नाही. पण या जनतेला माहित आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आम्ही या  जिल्ह्यात काय काम केले आहेत.

ही निवडणूक फक्त खासदार निवडून देण्यासाठी नाही तर देशाच्या निकासाठी आहे. त्यामुळे आपण सर्वानी संकल्प करायचा आहे की निवडणूक फक्त रक्षाताई आणि स्मिताताई यांना जिंकवण्यासाठी नाही तर देशाच्या विकासासाठी आहेत, असे मत रक्षा खडसे यांनी व्यक्त केले.