संजय राऊतांवर रामदास कदम यांचे खळबळजनक आरोप, म्हणाले रश्मी ठाकरेंना..

रत्नागिरी : राज्यात सत्तासंघर्षांचं राजकारण चांगलच तापलं आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निकाल शिंदे गटाच्या बाजूने दिला. त्यानंतर राज्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे.

दरम्यान, या निर्णयानंतर ठाकरे गट आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यामध्ये चांगलेच आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वीच खासदार संजय राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर सुपारी दिल्याचा आरोप केला होता. यावर आता शिवसेना नेते रामदास कदम यांनी संजय राऊतांवर खळबळजनक आरोप केला आहे.

काय म्हणाले रामदास कदम?
संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्यांचं हे कारस्थान आहे. मात्र लवकरच संजय राऊत यांचा भंडाफोड करणार असल्याचा इशारा रामदास कदम यांनी दिला आहे. रत्नागिरीत खेड येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

त्याचबरोबर याबद्दल पुढे बोलताना त्यांनी ‘सामना’चे संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांच्या पत्नीला शिवीगाळ करत होते. सामनाच्या संपादकपदी रश्मी ठाकरे यांची नेमणूक झाल्यावर राऊत शिवीगाळ करत होते, असं खळबळजनक वक्तव्य रामदास कदम यांनी केला आहे.

संजय राऊतांना लगावला टोला
दरम्यान, संजय राऊत हे शिवसेनेत राहून राष्ट्रवादी काँग्रेससाठी काम करतात, असा आरोप नेहमी केला जातो. रामदास कदम यांनी यावरून जोरदार टीका केली आहे. संजय राऊत हे मुळात शिवसैनिकच नाहीत, असा टोला रामदास कदम यांनी लगावला आहे.