नंदुरबार : ई केवायसी न केलेल्या लाभार्थ्यांना आता ३० जून शेवटची मुदत दिली आहे. ३० जूनपर्यंत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील तीन लाख ६९ हजार ८२९ रेशन कार्डधारकांनी ई-केवायसी केली नाही तर त्यांचे रेशन बंद होणार आहे. त्यासाठी या कार्डधारकांनी तातडीने ई-केवायसी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे. चौधरी यांनी केले आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील जिल्ह्यातील १२ लाख ५१ हजार ७४९ लाभार्थीचे ई-केवायसी लाभार्थी प्रमाणीकरण करणे बंधनकारक असून, त्यातील ८ लाख १९ हजार २० लाभार्थीनी (७०.४६ टक्के) आपली ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. तब्बल ३ लाख ६९ हजार ८२९ (२९.५४ टक्के) लाभार्थीनी अद्यापही ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांनी ती तत्काळ पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी महेश ई-केवायसी प्रणाली आधार क्रमांक संलग्न शिधापत्रिकेमध्ये नमूद योग्य व्यक्ती असल्याची खात्री करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
यामुळे शिधापत्रिकेसोबत संलग्न करण्यात आलेले आधार क्रमांक बरोबर असल्याची आणि शिधापत्रिकेमध्ये नमूद असलेल्या व्यक्ती त्याच असल्याची खात्री केली जाते. लाभार्थी आपले ई-केवायसी दोन प्रकारे करू शकतात, यामध्ये जिल्ह्यातील सर्व रास्त भाव दुकानांमध्ये ई-पॉस मशीनद्वारे मोफत करता येईल. तसेच शासनाने जनतेच्या मागणीनुसार ‘मेरा ई-केवायसी’ मोबाइल अॅप कार्यान्वित केले आहे, ज्यामुळे लाभार्थी स्वतःहून काही मिनिटांत आपले आणि कुटुंबातील सर्व लोकांचे ई-केवायसी पूर्ण करू शकतात.
सध्या जिल्ह्यात ३ लाख ६९ हजार ८२९ लाभार्थीची ई-केवायसी प्रलंबित आहे. ई-केवायसी प्रलंबित आहे, अशा लाभार्थीनी ३० जूनपर्यंत करून घ्यावी, असे आवाहनही जिल्हा पुरवठा अधिकारी महेश चौधरी यांनी केले आहे.