---Advertisement---

‘त्या’ विवाहितेच्या आत्महत्येचे कारण आले समोर, वाचून तुम्हालाही बसेल धक्का !

---Advertisement---

जळगाव : पुण्यातील वैष्णवी हगवणे या विवाहितेच्या आत्महत्येने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. अशातच जळगाव जिल्ह्यात एका ३४ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना एरंडोल येथे ४ जून रोजी रात्री घडली होती. अखेर या विवाहितेच्या आत्महत्येचे कारण समोर आले आहे. मनिषा सागर सोनार (३४) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

एरंडोल येथील मनिषा सागर सोनार (३४) या विवाहितेने घराच्या वरच्या मजल्यावर सिलींगच्या कडीला अडकवलेल्या दोराच्या सहाय्याने गळफास घेतला होता. ही घटना ४ जून रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास उघडकीस आली होती. याप्रकरणी पोलिस स्टेशनला मृत महिलेचे भाऊ मनोज पोतदार यांनी फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मनिषा हिचा सागर पल्लीवाळ (सोनार) यांच्याशी २०१४ मध्ये विवाह झाला होता. त्यांना शर्विल नावाचा ९ वर्षांचा मुलगा आहे. सागर पल्लीवाळ हा पुणे येथे नोकरीस असून तो पुण्यातच राहतो. मात्र मनिषा ही मुलासोबत एरंडोल येथे सासरी राहत होती.

चारित्र्याच्या संशयावरून केला जात होता छळ


तिचा पती सागर हा अधूनमधून एरंडोल येथे येत जात होता. तिचे पती सागर पल्लीवाळ, सासू मंगला पल्लीवाळ, जेठ गणेश पल्लीवाळ, जेठाणी सुषमा पल्लीवाळ हे मनिषा हिच्यावर चारित्र्याचा संशय घेऊन तिचा शारीरिक व मानसिक छळ करीत असत, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. ५ जून रोजी मनिषाचे मामसासरे किशोर मुंडके यांनी शिरपूर येथे घरी येऊन मनिषाने दोरीने गळफास घेतल्याचे सांगितले. त्यामुळे माहेरची मंडळी एरंडोल येथे आली असता त्यांना ग्रामीण रुग्णालय एरंडोल येथे मनिषाच्या मृतदेहावर, गळ्यावर लाल रंगाचे वळ पडलेले दिसले. त्यामुळे मनिषा हीने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची फिर्याद एरंडोल पोलिस स्टेशनला देण्यात आली. याप्रकरणी सागर शामकांत पल्लीवाळ व गणेश शामकांत पल्लीवाळ यांना अटक केल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment