Rohit Sharma : कोणाच्या डोक्यावर फोडले भारताच्या पराभवाचे खापर?

सेंच्युरियन: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत पराभावाचा सामना करावा लागला आहे. पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशीच आफ्रिकन १डाव आणि ३२ धावांनी पराभव केला. भारतीय संघ पराभव कामगिरी दाखवण्यात अपयशी ठरला. दक्षिण आफ्रिकेकडून झालेल्या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माचे (Rohit Sharma) वक्तव्य समोर आले आहे. रोहित शर्माने भारताच्या पराभवासाठी नेमके कोणाला जबाबदार धरले आहे, जाणून घ्या

रोहित शर्माने सेंच्युरियन कसोटीतील पराभवासाठी खराब फलंदाजीला जबाबदार धरले आहे. याशिवाय रोहित शर्माने गोलंदाजीवरही अनेक प्रश्न उपस्थित केले. सामन्यानंतर बोलताना रोहित शर्मा म्हणाला की आम्हाला फलंदाजीमध्ये अनेक आव्हानांचा सामना करावा लागला ज्यामुळे आम्ही योग्य ताळमेळ साधू शकलो नाही. केएल राहुलने पहिल्या डावात चांगली फलंदाजी केली पण नंतर गोलंदाजीत आम्ही काही विशेष करू शकलो नाही. हे मैदान बाऊंड्रीसाठीचे मैदान होते, पण प्रतिस्पर्धी संघाची ताकद आम्हाला समजून घेलली नाही. दोन्ही डावात आमची फलंदाजी खूपच खराब राहिली.

पहिल्या कसोटीत रोहित शर्मा फ्लॉप

कर्णधार रोहित शर्मा पहिल्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात फ्लॉप ठरला. टीम इंडियाला रोहित शर्माकडून खूप अपेक्षा होत्या पण रोहित त्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाही. रोहितने पहिल्या डावात ५ धावा केल्या तर दुसऱ्या डावात रोहित खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. रबाडाने दोन्ही डावात रोहित शर्माला बाद केले. रोहित शर्मा आता एकदिवसीय विश्वचषक २०२३ नंतर आता क्रिकेट खेळत आहे पण पहिल्या कसोटी सामन्यात रोहित फ्लॉप झाला. आता दुसऱ्या कसोटी सामन्यात रोहितला नव्या रणनीतीसह मैदानात उतरावे लागणार आहे.

 मालिका जिंकण्याचे भारताचे स्वप्न भंगले

आता भारतीय संघाचे दक्षिण आफ्रिकेत पहिली कसोटी मालिका जिंकण्याचे स्वप्नही भंगले आहे. यावेळी भारतीय चाहत्यांना टीम इंडियाकडून मोठ्या अपेक्षा होत्या की टीम इंडिया प्रथमच दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर कसोटी मालिका जिंकेल. पहिल्या सामन्यातील पराभवाने हे स्वप्न आता भंगले आहे. आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर केवळ चार कसोटी सामने जिंकू शकला आहे. मालिकेतील दुसरा सामना संघाने जिंकला तरी ही मालिका १-१ अशीच संपुष्टात येईल. जे इतके सोपे असणार नाही.