संजय राऊतांचा पुन्हा हल्लाबोल, म्हणाले ‘ज्याने गद्दारी केली त्याला त्याच.. ‘

मालेगाव : उद्धव ठाकरे गटाची सभा आज मालेगावमध्ये सुरु आहे. यावेळी खासदार संजय राऊत यांनी शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री दादा भुसेंवर जोरदार टीका केली आहे.

 काय म्हणाले राऊत?
उद्धव ठाकरे यांच्या मालेगावमधील सभेला उपस्थित जनतेला उद्देशून संजय राऊत म्हणाले की, हे तुफान उसळलं आहे. या तुफानाला आता कोणी रोखू शकत नाही. हे ‘मालेगाव के शोले’ आहेत. शिवसेना काय हे पहायच असेल तर निवडणूक आयोगाने इथे येऊन पहावं.

शिवसेना फुटलेली नाही, सगळ्या जाती धर्मातील लोक शिवसेनेच्या पाठीशी उभे आहेत. शिवसेना कुठेही तुटलेली नाही, हललेली नाही, झुकलेली नाही. इलेक्शन कमिशनने चिन्ह काढलं असेल, नाव काढून घेतलं असेल पण बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना आजही ठामपणे या जमिनीवर उभी आहे. तिच्या हातात भगवा झेंडा आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं.

 

तसेच  कांद्याला भाव नाही. कांदा रस्त्यावर फेकला जातोय. पण आपल्याला सुहास कांदेला रस्त्यावर फेकायच आहे. ज्याने गद्दारी केली त्याला त्याच खोक्याखाली चिरडायचे आहे, असं आवाहन संजय राऊत यांनी उपस्थितांना केलं.