---Advertisement---
जळगाव : तीन दिवसांपासून स्थिर असलेल्या चांदीच्या भावात एक हजार रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे चांदी एक लाख आठ हजार ५०० रुपयांवर पोहोचली आहे. दुसरीकडे सोन्याचे भाव सोमवारच्या तुलनेत १०० रुपयांनी कमी होऊन ९९ हजार ३०० रुपयांवर आले आहे.
जळगावचे दर
सोने (शुद्ध) : १०२३८२ (-२००)
चांदी : १,११,२४० (+२,०००)
१४ जून रोजी, चांदीच्या भावात एक हजार रुपयांची वाढ होऊन ती एक लाख सात हजार ५०० रुपयांवर पोहचली होती. त्यानंतर तीन दिवस चांदी याच भावावर स्थिर होती. मात्र मंगळवारी दुपारी त्यात एक हजार रुपयांची वाढ होऊन ती एक लाख आठ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहचली. शनिवारी दुपारी सोने ९९ हजार ३०० रुपये प्रति तोळा झाले.
काय आहे परिणाम
इस्रायल- इराण देशांतील युद्ध दीर्घकाळ चालण्याचे संकेत आणि कच्च्या तेलाचे दर वाढल्याने चांदीचे भाव वधारले असून, आणखी दरवाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
---Advertisement---