मोठी दूर्घटना टळली, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री हेलिकॅाप्टर प्रवासात सुदैवाने बचावले !

राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह उद्योग मंत्री उदय सामंत आणि पार्थ पवार नागपूर ते गडचिरोली हेलिकॅाप्टर प्रवासात सुदैवाने बचावले. खराब हवामानामुळे हेलिकॅाप्टर पावसाळी ढगात भरकटले. हेलिकॅाप्टर पायलटने मोठ्या कौशल्याने हेलिकॅाप्टर जमीनीवर उतरवले. त्यामुळे पुढील मोठी दूर्घटना टळली.

अजित पवारांनी सांगितलं नेमकं काय घडलं ?
हेलिकॉप्टर व्यवस्थित उडालं, पण ते नंतर भरकटलं. हेलिकॉप्टर ढगात गेलं होतं. पण, देवेंद्र फडणवीस निवांत गप्पा मारत होते, असं अजित पवार म्हणाले आहेत.

अजित पवार म्हणाले की, सुरुवातील बरं वाटलं, पण इकडे ढग, तिकडे ढग दिसत होतं. मी फडणवीसांना म्हटलं जरा बाहेर बघा. पण, ते म्हणाले काही काळजी करू नका. आतापर्यंत माझे सहा असे अपघात झाले आहेत. अशा अपघातामध्ये मला काही झालेलं नाही. त्यामुळे तुम्हाला देखील काही होणार नाही. तुम्ही निवांत राहा.

मी काळजीत पडलो होतो. पण, फडणवीस निवांत होते. मागची पुण्याई असेल. त्यामुळेच ते इथपर्यंत पोहोचले आहेत. उदय सामंत देखील आमच्यासोबत होते. ते म्हणाले दादा जमीन दिसायला लागली, तेव्हा कुठे माझा जीव भांड्यात पडला, असं अजित पवार म्हणाले.

सुदैवाने पायलटने कौशल्य दाखवत हेलिकॉप्टर जमिनीवर उतरवलं. त्यानंतर दोन्ही उपमुख्ममंत्र्यांनी गडचिरोलीच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. अजित पवार कार्यक्रमात बोलताना हा किस्सा सांगत होते.