थंडीनंतर पुन्हा ‘तो’ बरसणार, हवामान विभागाचा अंदाज

मुंबई : राज्यात सातत्यानं वातावरणात बदल  होत आहे. कधी थंडीचा जोर तर कधी पावसाची हजेरी अशी स्थिती निर्माण होत आहे. या बदलत्या वातावरणाचा आरोग्यावरही परिणाम होत आहे. आणखी पुढील दोन ते तीन दिवस राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

उत्तर आणि पूर्व भागातून येणाऱ्या वाऱ्यांमुळं कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यानं तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. परिणामी बदलत्या हवामानाचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. पिकांवर विविध रोगांचा परिणाम होत आहे. त्यामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत.