ठाकरे गटानं न्यायपालिकेवर केला विश्वास व्यक्त

मुंबईः राज्यातल्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीत दुसऱ्या दिवशीही ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद सुरू आहे. अध्यक्षांचे अधिकार, अपात्रतेची कारवाई यावरून घमासान न्यायालयात सुरू आहे.

पक्ष सोडून गेलेले 39 आमदार हे विधिमंडळ पक्षाचे सदस्य आहेत.  मात्र ते पक्ष हायजॅक करू शकत नाहीत. जर तुम्ही त्या कायद्याचा दुरुपयोग होऊ दिला तर तो सरकार पाडण्याचे नवीन मॉडेल असेल, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी कोर्टात केला होता.

ठाकरे गटाच्या आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीवर शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून वेगवेगळी मतं व्यक्त केली जात असली तरी सर्वोच्च न्यायालयात आमची भूमिका एकूण घेतली जात आहे असे मत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केले आहे. यावेळी बोलताना त्यांनी आपल्या पक्षातर्फेदेखील आम्ही आमची बाजू योग्य पद्धतीने मांडत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीबाबत मत व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, सर्वोच्य न्यायालय याबाबत आता सकारात्मक विचार करत आहे. त्यामुळे दोन दिवसांपासून सुरु असलेली सुनावणी ही नैसर्गिक न्यायाला धरून असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.