राजस्थानमध्ये काँग्रेसच्या पराभवाची  ‘हे’ आहेत पाच कारणं?

राजस्थान विधानसभा निवडणुकीची मतमोजणी (Rajasthan Assembly Election Results) सुरू झाली आहे. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये विरोधी पक्षात असलेला भारतीय जनता पक्ष (BJP) बहुमतासह सत्तेत परतताना दिसत आहे. भाजप 117 जागांवर आघाडीवर आहे.

सत्ताधारी काँग्रेस 66 जागांवर आघाडीवर आहे. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजपने बहुमताचा आकडा पार केला आहे. त्यामुळे  राजस्थान राज्यातील काँग्रेस पक्ष सत्तेतून बाहेर पडण्याचे संकेत मिळत आहेत. या पराभवाचे कारणं काय? काँग्रेसचा पराभव होत असेल तर त्याची पाच कारणे कोणती? जाणून घेऊ यात…

गटबाजी: विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वीपर्यंत काँग्रेस पक्षात गटबाजी पाहायला मिळत होती. मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वादाचा परिणाम कार्यकर्त्यांवरही झाला आणि जनतेमध्ये चुकीचा संदेश गेला. मात्र, निवडणुकीपूर्वीच दोन्ही नेते आम्ही एकत्र आहोत, असा संदेश देताना दिसले. परंतु, तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

मोदी विरुद्ध गेहलोत निवडणूक : राजस्थानमध्ये मोदी विरुद्ध गेहलोत अशी निवडणूक काँग्रेसला महागात पडतांना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चेहऱ्याने काँग्रेसच्या जात जनगणनेच्या मुद्याला देखील अयशस्वी ठरवलं. पंतप्रधान मोदींनी राजस्थानमध्ये निवडणूक रॅली घेतल्या, तर दुसरीकडे काँग्रेसच्या प्रचाराचा भार सीएम गेहलोत यांच्या खांद्यावर अधिक असल्याचे दिसून आले. राहुल गांधी निवडणुकीच्या प्रचारासाठी मैदानात उतरले पण तेही मोजक्याच ठिकाणी. निवडणूक पूर्णपणे मोदी विरुद्ध गेहलोत अशी झाली आणि भाजपलाही याचा फायदा झाला.

कन्हैयालाल खून प्रकरणाचा मोठा परिणाम : राजस्थान निवडणुकीत भाजपने उदयपूरच्या कन्हैयालाल हत्या प्रकरणाचा मुद्दा बराच उचलून धरला. भाजपची ही रणनीतीही प्रभावी ठरताना दिसत आहे. मारवाड भागात उदयपूर येते. जो मेवाड जिंकतो तो राजस्थान जिंकतो असे राजस्थानच्या राजकारणात म्हटले जाते. तर, कन्हैयालाल खून प्रकरणासोबतच कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा भाजपने उचलून धरला आणि त्याचाच फायदा भाजपला होतांना दिसत आहे.

बंदोखोरीचा मोठा फटका: काँग्रेसच्या पराभवामागे बंडखोर हेही प्रमुख कारण मानले जात आहे. काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्याने अनेक नेत्यांनी पक्षाविरोधात बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. काहींनी भाजप आणि इतर पक्षांच्या तिकिटावर निवडणूकही लढवली. या बंडखोरांनी काँग्रेसलाही खिंडार पाडले. याउलट भाजपने प्रत्येक बंडखोराला मनवण्याची जबाबदारी बड्या नेत्यांवर दिली आणि त्यांना मनवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. अनेक बंडखोरांनी सहमती दर्शवल्याने भाजपला याचा फायदा होताना दिसत आहे.