शेतकऱ्यांसाठी होणार ‘ही’ स्पर्धा ; मिळेल हजारोंची बक्षिसे, सहभागी होण्याची प्रक्रिया पहा..

जळगाव । राज्यातील उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी विभागाने तृणधान्य आणि कडधान्य पिकांची स्पर्धा आयोजित केली आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगांव जिल्ह्यामधील खरीप हंगामातील पिकांसाठी ही स्पर्धा होणार असून या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

प्रयोगशिल शेतकऱ्यांना मार्गदर्शन, इतर शेतकऱ्यांच्या पिक उत्पादनात वाढ करणे, शेतकऱ्यांचे मनोबल वाढविणे, पिकाच्या क्षेत्रात उत्पादन तंत्रज्ञानाचा प्रसार करणे व वाढ करणे हा या योजनेचा उद्देश आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठीची अंतिम तारीख काय?

या पीक स्पर्धेत खरीप हंगामामधील भात, ज्वारी, मका, नाचणी (रागी), तूर, मुग, उडीद, सोयाबीन, भुईमुग सूर्यफुल या पिकाचा अंर्तभाव केला आहे. मूग व उडीद पिकांसाठी ३१ जुलै, भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी) तूर, सोयाबीन, भुईमुग व सुर्यफुल या पिकासाठी ३१ ऑगस्ट अंतिम दिनांक आहे.

ही आहे आवश्यक कागदपत्रे 

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पिकनिहाय प्रत्येकी ३०० रूपये फी आहे. स्वतःच्या नावावर जमिनीचा ७/१२ व ८- अ उतारा सहभागासाठी आवश्यक कागदपत्रे आहेत. आदिवासी शेतकऱ्यांकरिता जातीचा दाखला आवश्यक आहे.

इतके रुपये बक्षीस मिळेल?
तालुका पातळी प्रथम बक्षिस ५ हजार रूपये, व्दितीय- ३ हजार रूपये , तृतीय – २ हजार रूपये बक्षिस आहे. जिल्हा पातळी प्रथम बक्षिस – १० हजार रूपये, व्दितीय- ७ हजार रूपये, तृतीय – 3 हजार रूपये, राज्य पातळी प्रथम बक्षिस -५० हजार रूपये, व्दितीय- ४० हजार तृतीय –३० हजार रूपये आहे. खरीप हंगाम पीक स्पर्धेत सहभागी होणेसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयांना संपर्क साधावा. असे आवाहन केले आहे.