हतनूर धरणामधील पाण्याची पातळी वाढली; उघडले 10 दरवाजे

जळगाव : गेल्या चार दिवसांपासून राज्यभरात मुसळधार पाऊस सुरु आहे. अशात हतनूर धरणातील पाण्याच्या पातळीतही वाढ झाल्याने धरणाचे १० दरवाजे उघडण्यात आले आहे. आता धरणातून १९,१०५ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत असल्याने तापी नदीला पूर आला आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

मध्यप्रदेशात मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे तापी- पूर्णा नदीच्या पाण्याचा स्त्रोत वाढला असून मोठा पूर आला आहे. त्या मुळे हतनूर धरण क्षेत्रातील पाण्याचा पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे.

तसेच हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस झाल्याने सोमवारी धरणाचे १० दरवाजे १ मीटरने उघडण्यात आले असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.