LSG vs RCB IPL 2025 : एकाना क्रिकेट स्टेडियमवर आज मंगळवारी (२७ मे) रोजी सायंकाळी ७.३० वाजता लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात साखळी फेरीतील शेवटचा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याच्या निकालावरून क्वालिफायर १ मध्ये कोणता संघ पंजाब किंग्ज विरुद्ध आणि कोणते संघ एलिमिनेटर सामना खेळतील हे ठरेल. पण आज पावसाने खेळ खराब केला तर कोणत्या संघाला फायदा होईल, हे जाणून घेऊया.
आयपीएल प्लेऑफमधून बाहेर पडलेला लखनौ सुपर जायंट्स आज आरसीबीचा खेळ खराब करण्याच्या आणि त्यांच्या हंगामाचा शेवट चांगल्या पद्धतीने करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल. जर आरसीबी जिंकला तर ते क्वालिफायर १ मध्ये आपले स्थान निश्चित करेल, त्यानंतर त्यांचा सामना पंजाब किंग्जशी होईल आणि हा सामना जिंकणारा संघ थेट अंतिम फेरीत जाईल. विशेषतः क्वालिफायर १ मध्ये पोहोचणाऱ्या संघासाठी चांगली गोष्ट म्हणजे पराभवानंतर त्यांना अंतिम फेरीत पोहोचण्याची आणखी एक संधी मिळेल. एलिमिनेटर सामना जिंकणाऱ्या संघाशी सामना करावा लागेल, जो संघ हा सामना जिंकेल तो दुसरा अंतिम फेरीत पोहोचेल.
आरसीबीचे सध्या १७ गुण आहेत, जर त्यांनी विजय मिळवला तर त्यांचे १९ गुण होतील आणि ते गुजरातला मागे टाकून दुसऱ्या स्थानावर येतील. पण जर रजत पाटीदार आणि टीम हरले तर त्याचा फायदा गुजरात टायटन्सला होईल. गुजरातचे १४ सामन्यांनंतर १८ गुण आहेत. मुंबई इंडियन्सबद्दल बोलायचे झाले तर, पंजाब किंग्जकडून पराभव पत्करल्यानंतर, ते आता कोणत्याही प्रकारे टॉप २ मध्ये येऊ शकत नाहीत.
पाऊस पडला तर काय होईल?
जर आज लखनौमध्ये पावसाने खेळ खराब केला तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला त्याचा फायदा होईल. या परिस्थितीत गुजरात आणि बंगळुरूचे १८-१८ गुण असतील पण नेट रन रेटच्या बाबतीत आरसीबी जिंकेल. आरसीबी (०.२५५) गुजरात (०.२५४) पेक्षा खूपच कमी फरकाने पुढे आहे.
आज लखनौमध्ये ढगाळ वातावरण असेल, पाऊस देखील पडू शकतो पण पावसामुळे सामना रद्द होण्याची शक्यता खूपच कमी आहे. प्लेऑफ सामन्यांच्या वेळापत्रकाबद्दल बोलायचे झाले तर, क्वालिफायर १ आणि एलिमिनेटर सामने मुल्लानपूर येथे खेळवले जातील आणि क्वालिफायर २ आणि अंतिम सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर होईल.