आंध्र प्रदेश : काँग्रेसच्या अध्यक्षा वायएस शर्मिला रेड्डी यांना अटक

विजयवाड़ा: आंध्र प्रदेशात राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. बेरोजगार युवक आणि विद्यार्थ्यांच्या कथित समस्या सोडवण्यासाठी काँग्रेसच्या आंध्र प्रदेश अध्यक्षा वायएस शर्मिला रेड्डी यांनी भाऊ वायएसआरसीपी नेते आणि मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या सरकारविरोधात मोर्चा काढला आहे.

शर्मिला रेड्डी म्हणाल्या की, जगन मोहन रेड्डी गेल्या पाच वर्षांत तरुण, बेरोजगार आणि विद्यार्थ्यांचे महत्त्वाचे प्रश्न सोडवण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. त्यांनी आपल्या एक्स पोस्टवर लिहिले की , ‘जर आम्ही बेरोजगारांच्या वतीने निषेधाचे आवाहन केले तर तुम्ही आम्हाला नजरकैदेत ठेवण्याचा प्रयत्न कराल का? लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार नाही का? अटक टाळण्यासाठी एक महिला म्हणून मला काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात पळून जावे लागले, ही लाजिरवाणी गोष्ट नाही का?

शर्मिला यांनी गुरुवारी बेरोजगार युवक आणि विद्यार्थ्यांच्या कथित समस्या सोडवण्यासाठी ‘चलो सचिवालय’ मोर्चाची हाक दिली. यावेळी त्या सचिवालयाच्या दिशेने जात असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले.