आम्ही नवरदेववाले, ते नवरीवाले आता…; काय म्हणाले मंत्री गुलाबराव पाटील ?

by team

---Advertisement---

 

जळगाव : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप विरुद्ध शिंदे गटात नाराजीचे चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या काळात भाजपकडून ज्या चुका झाल्या त्या पुन्हा होऊ नये, अशी अपेक्षा मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली आहे.

माध्यमांशी बोलतांना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, 1990 सालापासून आम्ही भाजपचा खासदार आम्ही निवडून दिला आहे. यावेळी सुद्धा आम्ही कुठल्या गोष्टीची कमतरता करणार नाही. मागच्या लोकसभेत भाजपसाठी प्रामाणिकपणे काम केल्यानंतर विधानसभेत आमच्यासमोर भाजपने बंडखोर उमेदवार उभे केले होते.आम्ही नवरदेव वाले आहोत. ते नवरीवाले आहेत. त्यामुळे पुढच्या काळात त्यांनी आम्हाला नवरदेव वाला समजून मदत करावी हीच अपेक्षा आहे. गेल्या काळातील केलेल्या चुकांची पुढच्या काळात भाजपकडून पुनरावृत्ती होऊ नये. अशी अपेक्षा आहे, असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---