आशिष शेलार : दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंनी स्वत:हून एसआयटी चौकशीला सामोरं जायला हवं

मुंबई : दिशा सालियान प्रकरणी उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांची एसआयटी चौकशी होणार असल्याचे बोलले जात आहे.दिशा सालियान मृत्यू प्रकरणी ज्या पद्धतीने संशयाचं धुकं निर्माण झालंय ते स्पष्ट झालं पाहिजे, अशी प्रतिक्रिया मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिली आहे. आशिष शेलार यांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचे कामकाज संपल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, “दिशा सालियान मृत्यूप्रकरणी एसआयटी चौकशी होणार की नाही याबाबतचा निर्णय सरकार घेईल.

परंतू, ज्या पद्धतीने संशयाचं धुकं निर्माण झालंय ते स्पष्ट झालं पाहिजे. वातावरण स्पष्ट व्हायला हवं. लोकांच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरे मिळायला हवी. ज्याप्रकारचे पुरावे बाहेर येत आहेत त्याबद्दलचं स्पष्टीकरण पोलिस खात्याकडून मिळायला हवं,” असे ते म्हणाले.ते पुढे म्हणाले की, “आदित्य ठाकरेंनी स्वत:हून एसआयटी चौकशीला सामोरं जायला हवं. कारण एसआयटीला विरोध करुन हा संशय वाढवणे चुकीचे ठरेल. त्यामुळे आदित्य ठाकरेंनी स्वत: या चौकशीकरिता पुढाकार घ्यावा,” असेही ते म्हणाले आहेत.