केंद्र सरकारचा मोठा निर्णय, दिवाळीमध्ये डाळी होणार स्वस्त

नवी दिल्ली: डाळीची ताजी आवक आणि ही जास्त प्रमाणात झाली आहे.यामुळे डाळींचे भाव खाली येऊ लागतील आणि पुढील सहा महिने स्थिर राहतील,एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. डाळींची भाववाढ वर्षभर सातत्याने उंचावली. सप्टेंबरमध्ये डाळींच्या घाऊक महागाईने 17.7 टक्क्यांच्या 48 महिन्यांतील उच्चांक गाठला. मसूर वगळता जवळपास सर्व प्रकारच्या डाळींचे भाव वाढले आहेत. हरभरा / तूर डाळीच्या किमतीत सर्वाधिक वाढ झाली आहे, ज्यांची किरकोळ महागाई सप्टेंबरमध्ये 37 टक्क्यांच्या सहा वर्षांच्या उच्चांकावर होती. सध्या देशात तूर डाळीची सरासरी किरकोळ किंमत 152 रुपये प्रति किलो आहे. तर उडदाचा भाव 119.70 रुपये प्रति किलो आहे.

कडधान्याखालील क्षेत्रात वर्षभराच्या आधारे सुमारे 6 टक्क्यांनी घट झाली असली, तरी नोव्हेंबरपासून नवीन आवक झाल्यामुळे डाळींच्या किमती कमी होतील, अशी सरकारला आशा आहे. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, ‘नवीन पिके बाजारात आल्याने पुढील सहा महिने भाव स्थिर राहतील अशी आमची अपेक्षा आहे. तसेच, ज्या आंतरराष्ट्रीय भौगोलिक प्रदेशातून आपण आयात करतो तेथे चांगली कापणी अपेक्षित आहे. याशिवाय, सरकारकडे सध्या सुमारे 40 लाख मेट्रिक टन डाळी आहेत, ज्या आवश्यकतेनुसार सोडल्या जातील. गेल्या हंगामात जादा खरेदी झाल्यामुळे यावर्षी आमचा बफर स्टॉक खूप जास्त आहे. हे आम्हाला वेळ आल्यावर किमती स्थिर ठेवण्यास मदत करेल.