जमिनीच्या वादातून दिराने केली दोन भाऊजायांची निर्घृण हत्त्या!

Crime : जमिनीच्या वादातून दिराने आपल्या दोन भाऊजयांचा निर्घृण खून केल्याची घटना अकोले तालुक्यातील बेलापूर बदगी या गावात घडली. दत्तात्रय प्रकाश फापाळे (50) याने सख्खी लहान भावजयी उज्ज्वला अशोक फापाळे (38), चुलत भावजयी वैशाली संदीप फापाळे (40) यांची सोमवारी धारदार कोयत्याने हत्या केली.

या बाबत अधिक माहिती अशी कि, आरोपी दत्तात्रय फापाळे  हा अविवाहित आहे. लहान भाऊ अशोक याचे लग्न झाले होते. मात्र दोन वर्षांपूर्वी त्याचे निधन झाले. त्याची पत्नी मृत उज्ज्वला आणि दोन मुले आळंदी येथे मोलमजुरीचे काम करत उदरनिर्वाह करतात. फाफळे कुटुंबाची बदगी गावात शेती आहे. त्या शेतीमध्ये दत्तात्रय आणि उज्ज्वला वर्षाआड शेती पीक घ्यायचे. शेतातील सोयाबीन काढण्यासाठी उज्ज्वला आली होती. उज्ज्वला गावाला आल्यापासून दीर दत्तात्रयचे पैशावरून वाद व्हायचे. वैशाली दवाखान्यात उपचार घेऊन उज्ज्वलाशी गप्पा मारत होती. यावेळी दत्तात्रय याने उज्ज्वलावर वार केला वार होताच वैशाली तिला सोडवायला गेली असता दत्तात्रयने तिच्यावरही सपासप तीन वार केले आणि त्यातच दोघींचा जीव गेला.