तुमचे मुले पण असेल पहिली, दुसरीला तर वाचा ही बातमी, हा आहे शासनाचा नवीन नियम

नागपूर:  येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील इयत्ता दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी ९ वाजतानंतरच सुरू करण्यात येईल, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानसभेत केली. यासंदर्भात राज्यपाल रमेश बैस यांनी सूचना केली होती.मागील आठवड्यात लहान मुलांच्या शाळेच्या वेळेसंदर्भात विधानसभेत जोरदार चर्चा झाली. सकाळी शाळा असल्याने विद्यार्थ्यांची पुरेशी झोप होत. नाही. मुलांच्या वाढीसाठी झोप होणे आवश्यक आहे.

झोपेअभावी लहान विविध होऊ मुलांना आजार लागले असल्याकडे आमदारांनी लक्ष वेधले. पहाटे शाळा असेल तर, लहान मुलांची झोप पूर्ण होत नाही. त्यामुळे त्यांची शाळा उशिराने सुरू करण्याबाबत सरकारने विचार करावा, असे राज्यपालांनी अलिकडेच सुचविले होते,याचा उल्लेखही अनेक आमदारांनी आपल्या भाषणातून केला होता.राज्यपालांच्या या मताशी सरकार सहमत आहे. मात्र, एकट्याने याबाबत निर्णय घेणे योग्य नसल्याने तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे. मनोवैज्ञानिक, बालरोगतज्ज्ञांच्या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असे केसरकर यांनी सांगितले. पुढील शैक्षणिक वर्षापासून सर्व माध्यमांच्या आणि सर्व शिक्षण मंडळांच्या शाळांना हा नियम लागू असेल, असेही ते म्हणाले.नवा पूर्व प्राथमिक विभाग बालवाडी, छोटा शिशू आणि मोठा शिशू हे वर्ग निर्माण करून ते मुख्य शाळेला जोडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तशी घोषणा मागील आठवड्यात मंत्री केसरकर यांनी विधानसभेत केली होती, हे विशेष.