देवदर्शनासाठी पायी निघालेल्या भाविकांना पीकअपने चिरडले ; चौघांचा मृत्यू

हिंगोली । राज्यात अपघाताच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होतं असल्याचं दिसत असून अशातच हिंगोलीमधून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. ज्यात भरधाव पीकअपने ९ भाविकांना चिरडल्याची घटना घडली. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर पाच जण गंभीर जखमी झाले आहे

ही घटना हिंगोली वाशिम राष्ट्रीय महामार्गावर घडली. हिंगोली तालुक्यातील सिरसम येथील भाविक माळहिवरा पाटी येथील मारुतीच्या दर्शनाला निघाले होते.मात्र भाविकांना भरधाव वेगाने जाणाऱ्या पिकप वाहनाने चिरडल्याची घटना घडली. या अपघातात चार भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून ५ जण गंभीर जखमी झालेत.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच जखमी भाविकांना हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.