नऊ क्षेपणास्त्रे डागण्याची तयारी अन् पाकिस्तानचा थरकाप, अभिनंदनच्या सुटकेसाठी मोदींची ‘कूट’ नीती

नवी दिल्ली:  २०१९ च्या फेब्रुवारीत विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेसाठी भारताने एकाच वेळी नऊ क्षेपणास्त्र पाकिस्तानवर डागण्याची तयारी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या कूटनीतीने पाकिस्तानला घाम फोडला होता, असा दावा पाकिस्तानातील तत्कालीन भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांनी आपल्या ‘अँगर मॅनेजमेंट’ या पुस्तकात केला आहे. या पुस्तकातून त्यांनी मोदींची मुत्सद्देगिरी अधोरेखित केली आहे. अजय बिसारिया २०१९ ची भारत पाकिस्तानमधील परिस्थितीचे वर्णन करताना पुस्तकात म्हटले की, फेब्रुवारीत पंतप्रधान मोदींच्या कूटनीतीने पाकिस्तानला घाम फोडला

ठरली असती ‘कत्ल की रात’
तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान यांना नरेंद्र मोदींशी बोलायचे, असा निरोप अजय बिसारिया यांना त्याच रात्री आला होता. दुसऱ्या दिवशी इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या संसदेत अजित बसारियांना नरेंद्र मोदींशी शांतता राखण्याचे आवाहन करणारा निरोप दिल्याचे मान्य केले. त्यानंतर विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तानने सोडले. त्यानंतरही इम्रान खान यांनी मोदींशी संवाद साधण्याचा अनेकदा प्रयत्न केला; परंतु मोदींनी ते टाळले. पाकिस्तानला कारवाईचा इशारा देताना नरेंद्र मोदी २०१९ साली एका रॅलीमध्ये म्हटले होते की, सुदैवाने पाकिस्तानने अभिनंदनला सोडले, अन्यथा ती ‘कत्ल की रात’ ठरली असती.

होता. भारताने तब्बल नऊ क्षेपणास्त्रे पाकिस्तानवर डागण्याची तयारी केली होती. भारताची ही युद्धसज्जता पाहून तत्कालीन पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी मोदींना फोन करण्याचा प्रयत्न केला, पण मोदींनी प्रतिसादच दिला नाही. त्यापूर्वी पाकिस्तानातील अधिकारी अजय बिसारिया यांच्या घरीही पोहोचले होते. ही रात्र २७ फेब्रुवारी २०१९ ची होती. हा तोच दिवस आहे, जेव्हा भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्धमान पाकिस्तानच्या ताब्यात होते.हा घटनाक्रम बिसारिया यांनी त्यांच्या अँगर मॅनेजमेंट या पुस्तकात शब्दबद्ध केला. भारताच्या या आक्रमक कूटनीतीने आणि कोणत्याही क्षणी हल्ला होण्याच्या शक्यतेने पाकिस्तान त्यांच्या दहशतवाद्यांना आश्रय देण्याच्या भूमिकेचाही विचार करायला तयार झाले होते, असा दावा बिसारिया यांच्या पुस्तकात करण्यात आला. भारताच्या या तयारीमुळे पाकिस्तानला दोनच दिवसात अभिनंदन वर्धमान यांची सुटका करावी लागली.