ना.गुलाबराव पाटील : नाशिक विभागातील पाणीपुरवठा योजनेच्या कामाना गती द्या ना

नाशिक विभागातील जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाणी पुरवठा योजनाच्या  प्रलंबित कामाना गती देऊन ती कामे मार्च 2024 पर्यंत दर्जेदार व मुदतीत पुर्ण करण्याचे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. नाशिक भागातील पाणी पुरवठा योजनांच्या कामाबाबतीत आढावा बैठक मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे झाली.

त्यावेळी ते बोलत होते.यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र जीवन प्रधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, जलजीवन मिशनचे संचालक अमित सैनी, मुख्य अभियंता मनीषा पलांडे, अधिक्षक अभियंता अजय सिंह , नाशिक विभागातील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.  ना.गुलाबराव पाटील म्हणाले की,  नाशिक विभागातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ज्या पाणीपुरवठा योजनाच्या कामाला कार्यारंभ आदेश  दिला नसेल अशा कामाना तत्काळ कार्यारंभ आदेश देण्यात यावा. ज्या गावातील पाणीपुरवठा योजनाना  अडचणी असतील त्यासाठी तेथील ग्रामसभेचा ठराव घेऊन निर्णय घ्यावा.  यासाठी लोकप्रतिनिधीचे सहकार्य घ्यावे तसेच जे ठेकेदार काम करीत नाही त्यांच्यावर कारवाई करावी, असे निर्देश दिले.

जळगाव ग्रामीण आणि धरणगाव तालुक्यातील पाणी पुरवठा योजनाच्या कामाचा घेतला आढावा

ना.गुलाबराव पाटील यांनी  पाणीपुरवठा योजनेची कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावी. दर पंधरा दिवसांनी कामाच्या प्रगतीचा अहवाल सादर करावा. योजनेसाठी दिलेला निधी वेळेत खर्च करावा. जे ठेकेदार काम वेळेत आणि दर्जेदार करीत नाही, त्यांच्यावर कारवाई करावी. पाणीपुरवठा योजनाची कामे मार्च 2024 पर्यंत पूर्ण करावीत, अशा सूचनाही मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी केल्या.