‘पंतप्रधान मोदींना चौथ्या टप्प्यातच बहुमत मिळाले’, अमित शहांनी केला मोठा दावा

बंगाल : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालमधील बनगाव येथे जाहीर सभेला संबोधित करत विरोधकांवर निशाणा साधला. रॅलीदरम्यान अमित शाह यांनी दावा केला की, पंतप्रधान मोदींनी 380 पैकी 270 जागा मिळवून पूर्ण बहुमत मिळवले आहे.

अमित शाह म्हणाले, “मतदानाचे चार टप्पे पूर्ण झाले आहेत. 380 जागांसाठी निवडणूक पूर्ण झाली आहे. बंगालमध्ये 18 जागांसाठी निवडणूक पूर्ण झाली आहे. आज मी तुम्हाला सांगतोय की 380 पैकी 270 जागा घेऊन पंतप्रधान मोदींनी निवडणूक पूर्ण केली आहे. 400 चा आकडा पार करायचा आहे.

अमित शहांचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
अमित शहा यांनी ममता बॅनर्जींवरही हल्लाबोल केला. ते म्हणाले, “ममता बॅनर्जी खोटे बोलत आहेत की जो कोणी CAA अंतर्गत नागरिकत्वासाठी अर्ज करेल त्याला समस्यांना सामोरे जावे लागेल. माटुआ समाजातील लोकांना कोणाचीही अडचण येणार नाही याची ग्वाही देण्यासाठी मी आलो आहे. तुम्हाला नागरिकत्वही मिळेल आणि देशात सन्मानाने जगता येईल. जगातील कोणतीही शक्ती माझ्या निर्वासित बांधवांना भारताचे नागरिक होण्यापासून रोखू शकत नाही, हे नरेंद्र मोदीजींचे वचन आहे.