पुण्यात नेमकं चाललंय काय? मोबाईल चोरल्याच्या संशयावरुन महिलेचा खून

पुणे: मागील महिन्याभरात राज्यात  गोळीबाराच्या अनेक घटना घडल्या आहेत . त्यासोबतच पुण्यातदेखील औंध परिसरात सराफा व्यावसायिकाने मित्रावर गोळी झाडली आणि त्यानंतर स्वत: आत्महत्या केली होती. अश्यातच पुण्यात पुन्हा एकद मोबाईल चोरल्याच्या संशयावरून एका महिलेची हत्या झाल्याची घटना समोर आलं आहे.

पुण्यातील बुधवार पेठेत मोबाईल चोरल्याच्या संशयावरुन तरुणांनी महिलेचा खून केल्या प्रकरणी पोलिसांनी 2 जणांना अटक केली आहे. वर्षा थोरात असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर याप्रकरणी अब्दुल सय्यद आणि गौरव चौगुले अशी आरोपींचे नाव आहे. या घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्ष ही फिरस्ती असून तिला दारुचे व्यसन होते. अब्दुल सय्यद हा अंडा भूर्जीचा व्याव्यसाय करतो. 10 – 15 दिवसांपूर्वी अब्दुल याचा मोबाईल चोरीला गेला होता़ हा मोबाईल वर्षाने ने चोरल्याचा त्याला संशय आला. या संशयावरून त्याने व गौरव यांनी थोरात बाई कडे मोबाईल बाबत विचारणा केली. त्यावरुन त्यांच्यात वादावादी झाली. तेव्हा त्यांनी वर्षा हिच्या डोक्यात काठीने मारहाण केली. घाव डोक्यात बसल्याने थोरात खाली कोसळली. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच धाव घेऊन दोन जणांना अटक केली आहे.