प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! पुण्याकडे जाण्यासाठी आता ‘ही’ रेल्वे झाली सुरु

तुम्हीपण जर भुसावळ ते पुणे प्रवासकरत असाल तर ही खुशखबर आहे तुमच्यासाठी, रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन अमरावती- सातारा दरम्यान अनारक्षित विशेष रेल्वे गाडी सुरु केली आहे. २३ जानेवारीपासून ही गाडी सुरु झाली असून भुसावळ जळगावहून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला  आहे. अमरावतीहुन ही गाडी दुपारी १.३० वाजेल सुटेल. त्यानंतर भुसावळ ही गाडी सायंकाळी ५ वाजून १० मिनिटाने पोहोचेल. जळगावला ५ वाजून ३७ मिनिटाने पोहोचेल.तर पहाटे पुण्याला ती ३ वाजून ४० मिनिटाने पोहोचेल.

गाडी क्र. ०११५५ अमरावती- सातारा अनारक्षित ही विशेष गाडी ता.२३ पासून सुरू झाली आहे.विशेष गाडी क्रमांक ०११५६ ही २८ जानेवारीस सातारा येथून साडेचारला सुटेल. अमरावती येथे दुसऱ्या दिवशी ११.०० वाजता पोहोचेल.

या स्थानकांवर आहे थांबा?
अमरावतीहुन सुटल्यानंतर बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड,कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौड कॉर्ड लाइन, पुणे, जेजुरी, लोणंद आणि सातारा या स्थानकावर थांबेल. या गाडीत सर्व १४ डबे सामान्य द्वितीय श्रेणीचे असतील.