बाळासाहेब असते तर अनधिकृत मशिद उध्वस्त केली असती, पण उद्धव ठाकरेंचं रक्त….; : नितेश राणेंचा घणाघात

मुंबई : धारावीमध्ये मशिदीचा अनधिकृत भाग पाडण्यावर संजय राऊतांनी टीका केली होती. यावर नितेश राणेंनी प्रतिक्रिया दिली कि बाळासाहेब असते तर बेकायदा मशिद उध्वस्त केली असती पण उद्धव ठाकरेंचं रक्त आता हिरवं झालंय, असा घणाघात भाजप आमदार नितेश राणेंनी केला आहे.

नितेश राणे म्हणाले की, “संजय राऊतांचा अनधिकृत बांधकामाला पाठिंबा आहे का? उद्या जर त्यांचा मैत्री बंगला वक्फ बोर्डच्या नावाने घेतला गेला तरी ते असेच बोलणार का? कधीतरी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार आत्मसात करा. आज हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असते तर त्या मशिदीचं एक इंचसुद्धा अनधिकृत बांधकाम ठेवू दिलं नसतं. त्या भागाचा खासदार उद्धव ठाकरेंच्या विचाराचा आहे. तुमच्यामध्ये खरंच बाळासाहेबांचं रक्त असेल तर त्या खासदारांनी मशिदीचं अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी पुढाकार घ्यावा. अन्यथा पाकिस्तानचा झेंडा हातात घेऊन जगभर फिरावं आणि माझं रक्त आता हिरवं आहे भगवं नाही, असं सांगून टाकावं,” अशी टीका त्यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, “धारावीमध्ये पुन्हा एकदा जिहादी मानसिकतेचं उत्तम प्रदर्शन तिथल्या जिहाद्यांनी केलं आहे. या जिहादी मानसिकतेच्या लोकांना आमच्या देशात आणि महाराष्ट्रात शरिया कायदा लागू करायचा आहे. एकीकडे संविधान बचाओच्या नावाने भुंकत राहायचं आणि दुसरीकडे, अतिक्रमण तोडण्यासाठी मुंबई महापालिकेची टीम आली असताना तिथल्या जिहाद्यांनी ते तोडू दिलं नाही. त्याचबरोबर त्यांनी मुंबई महापालिकेच्या गाड्याही फोडल्या. ही अरेरावी आणि दादागिरी त्यांनी त्यांच्या पाकिस्तान आणि बांग्लादेशमध्ये करून दाखवावी. हे आमचं हिंदू राष्ट्र आहे. आमच्या देशात आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे चालणार आहोत.”

“मशिदीच्या बाजूला झालेलं वाढीव बांधकाम अनधिकृत आहे हे सिद्ध झालेलं आहे. आम्ही अधिकृत मशिदींना हात लावत नाही. पण जो भाग अनधिकृत आहे तो तोडावाच लागणार. त्यांनी कितीही दादागिरी केली तरी जो न्याय हिंदू मंदिरांना आणि धर्मशाळांना लागू होतो तोच न्याय मशिदीच्या अतिक्रमणालाही लागू होणार,” असेही ते म्हणाले.