भाविकांच्या बसवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करा : विश्व हिंदू परिषद जळगाव शाखेची मागणी

जळगाव : जम्मू-काश्मीरमध्ये हिंदू भाविकांच्या बसवर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याविरोधात केंद्र सरकारला कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात यावे अशी मागणी विश्व हिंदू परिषद जळगाव जिल्हातर्फे राष्ट्रपतींना करण्यात आले आहे. यासंदर्भातील निवदेन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

निवेदनाचा आशय असा की, 9 जून रोजी, जम्मू-काश्मीरमधील वैष्णोदेवी कटरा येथून शिव खोडी येथे जात असताना, पाकिस्तान समर्थित इस्लामिक जिहादी दहशतवाद्यांनी हिंदू भाविकांच्या बसवर हल्ला केला. ज्यामध्ये 10 निष्पाप हिंदू यात्रेकरूंचा मृत्यू झाला. या क्रूर दुष्कृत्याने देश दुखावला आहे आणि तीव्र संताप आहे. कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरला पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा बराच काळ फटका बसला आहे. यानंतर आशेचा किरण जागृत झाला आहे. परंतु, या सर्वांमागे पाकिस्तानचा हात असल्याचे दिसून येते. देशाच्या नव्या सरकारच्या शपथविधीवेळी इस्लामी दहशतवाद्यांनी असे धाडसी कृत्य केले.

देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिले आहे. बजरंग दल मारल्या गेलेल्या हिंदू यात्रेकरूंना श्रद्धांजली अर्पण करतो.  परंतु,  या घृणास्पद कृत्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करतो. अशा कृत्यांवर पूर्णपणे नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारला निर्णायक आणि कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्याची विनंती करतो अशा घटकांना आश्रय देणाऱ्यांवरही कडक आणि योग्य कारवाई केली जावी अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदनावर जिल्हा सहमंत्री राजेंद्र गांगुर्डे, बजरंगदल संयोजक पवन झुंझारराव, जिल्हा धर्म प्रसार प्रमुख हरिष कोल्हे, मानस शर्मा, राकेश लोहार, यश पांडे, राकेश लोहार आदींची स्वाक्षरी आहे.