भीषण अपघात! ट्रकच्या धडकेत कार मधील सहा जण ठार, तीन जखमी

जौनपूर । देशभरात रस्ते अपघाताचे प्रमाण काही कमी होताना दिसत नसून दिवसेंदिवस यात वाढ होत आहे. यात आता उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातून एका भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. एका ट्रकने कारला धडक देऊन झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत.मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.

जौनपूर-आझमगड महामार्गावरील प्रसाद केरकट स्त्यावर शनिवारी रात्री २.३०च्या सुमारास हा अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारमधील शर्मा कुटुंबातील नऊ जण सीतामढीहून प्रयागराजकडे मुलाला लग्नासाठी मुलगी पाहायला निघाले होते. मात्र वाटेतच त्यांच्या कारला अपघात झाला. कार आणि ट्रकची धडक इतकी भीषण होती की कार सुमारे 10 मीटरपर्यंत खेचली गेली.

या घटनेनंतर जखमींना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.तिथे डॉक्टरांनी सहा जणांना मृत घोषित केले. तर तीन जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर ट्रक चालक आणि क्लीनर घटनास्थळावरुन पळून गेले.

मृतांची नावे
अनिश शर्मा (35)
गजाधर शर्मा (60)
जवाहर शर्मा (57)
गौतम शर्मा (17)
सोनम (34)
रिंकू (32)