मनोज जरांगेंच्या 24 तारखेच्या आंदोलनावर, कोर्ट काय म्हणालं?

Bombay High Court : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी, २४ तारखेपासुन रोज सकाळी १०:३० ते १ वाजेपर्यंच रास्ता रोको आंदाेलन करण्‍यात येईल. राज्यातील सर्व मराठे आरक्षणाच्‍या आंदाेलनात सक्रीय आहेत. ३ मार्चला प्रचंड शक्तीशाली रास्तारोको होणार. शांतता आणि एकजुट काय असते हे मराठ्यांनी दाखवून द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले होते. जरांगेंच्या आंदोलनाविरोधात गुणरत्न सदावर्तेंची हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरू आहे.

प्रशासनाला भिती असेल तर त्यांनी रितसर नोटीस पाठवावी –
राज्य सरकारनं याचिकाकर्त्यांसाठी युक्तिवाद करू नये. आम्हाला प्रशासनानं कुठलीही नोटीस पाठवलेली नाही, मनोज जरांगे यांच्या वतीनं जेष्ठ वकील विजय थोरात यांनी कोर्टात युक्तिवाद केला. बंद आणि तीव्र आंदोलनाची हाक मराठा आंदोलक समितीनं दिली आहे. मनोज जरांगे यांनी व्यक्ती म्हणून अशी घोषणा केलेली नाही, अशी माहिती मनजो जरांगेंचे वकील विजय थोरात यांनी माहिती दिली. राज्य सरकार याप्रकरणी हतबल झालीय, अशी परिस्थिती राज्यात कधीही नव्हती, असा दावाही यावेळी जरांगेंच्या वकिलांनी केला.

याचिकाकर्ते सदावर्तेंचा युक्तिवाद
जरांगेंचा हा दावा चुकीचा आहे. कोर्टातील हमीनंतरही जरांगेंची चिथावणी सुरूच आहे. 24 फेब्रुवारीपासून त्यांनी राज्यभरात चक्काजाम आणि तीव्र आंदोलनाची हाक दिली आहे. मनोज जरांगेंनी मीडियात पत्रकार परिषद घेत आंदोलनाचा सारा प्लान जाहीर केलाय, अशी माहिती याचिकाकर्ते सदावर्तेंनी कोर्टात युक्तिवाद केला.

कोर्ट काय म्हणाले ?
विरोध करण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे, मात्र त्यामुळे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही ही देखील तुमची जबाबदारी असल्याचं हायकोर्टानं मनोज जरांगे यांच्या वकिलांना सांगितलं.