---Advertisement---

मल्लिकार्जुन खरगे यांच्या प्रयत्नांना यश येईल का ? काय म्हणाले जयराम रमेश

by team
---Advertisement---

नवी दिल्ली:  नितीश कुमार पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये सामील होतील, अशी अटकळ बांधली जात असताना काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी असे म्हटले आहे की, मल्लिकार्जुन खर्गे यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशी बोलण्याचे अनेक प्रयत्न केले, पण दोघेही खूप व्यस्त होते, त्यामुळे त्यांच्यात कोणतीही चर्चा होऊ शकली नाही. ते म्हणाले, “बिहारमधून काही विधाने येत आहेत की तेथे नवीन मंत्रिमंडळ स्थापन केली जाईल. परंतु आम्ही काँग्रेस छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना वरिष्ठ निरीक्षक म्हणून बिहारला पाठवले आहे, माझ्या माहितीनुसार ते आज रात्री पाटण्यात पोहोचतील.” असे जयराम रमेश यांनी म्हटले आहे.

खरगे नितीशकुमार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत
कोणत्याही असत्यापित वृत्तांवर मी भाष्य करणार नाही असे जयराम रमेश म्हणाले, परंतु मल्लिकार्जुन खर्गे नितीश कुमार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असल्याची पुष्टी केली. इंडिया ब्लॉक मजबूत करणे ही प्रत्येक पक्षाची जबाबदारी आहे. आणि काँग्रेस या दिशेने काम करण्यास कटिबद्ध आहे. पुढे ते म्हणाले “आम्हाला राज्य पातळीवर समस्या असू शकतात, परंतु या आघाडीने आम्हाला एकत्र आणले आहे. बिहारचे मुख्यमंत्री हे या आघाडीचे शिल्पकार आहेत. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री हे या आघाडीच्या शिल्पकारांपैकी एक आहेत.त्यांना माहित आहे की ही राष्ट्रीय आघाडी आहे. ही युती नाही ज्यामध्ये राष्ट्रीय मुद्द्यांपेक्षा स्थानिक मुद्द्यांना प्राधान्य दिले जाईल. इथे राष्ट्रीय मुद्द्यांना प्राधान्य दिले जाईल.”

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment