मुस्लिमांना CAAकायद्यातून बाहेर का ठेवले ? अमित शहांनी सांगितलं कारण

CAA : नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) लागू झाल्यापासून विरोधकांकडून केंद्र सरकारवर सातत्याने टीका होत आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांना प्रत्युत्तर देताना सीएएबाबत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अमित शाह यांनी मुस्लिमांना या कायद्यापासून दूर ठेवण्याचे कारणही सांगितले. ते म्हणाले की, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश ही इस्लामिक राष्ट्रे आहेत. मग तिथे मुस्लिम धार्मिक अल्पसंख्याक कसे असतील? मात्र, तरीही त्यांना भारतीय नागरिकत्व हवे असल्यास ते संविधानिक मार्गाने अर्ज करू शकतात, असे त्यांनी सांगितले.