मैत्रिणीच्या घरी निघाली, पण वाटेतच अपहरण… घटनेनं देश हादरलं

Crime News : देशात महिलांवरील होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत. अशातच एक हादरवणारी घटना समोर आली आहे. १९ वर्षीय तरुणीला अपहरण करून घरात कोंडण्यात आलं. त्यांनतर तब्बल २० दिवस नराधमांनी पीडित तरुणीवर सामूहिक अत्याचार केला. या घटनेनं संपूर्ण देश हादरलं आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, घटनेचा पुढील तपास पोलिसांनी सुरु केला आहे.

पीडितेने आरोप केला आहे की, अत्याचार झाला त्यावेळी ती दारूच्या नशेत होती आणि तिचे अपहरण करुन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. त्यानंतर 7 जणांनी तिच्यावर 20 दिवस सामूहिक अत्याचार केला. पीडितेने आरोपीच्या तावडीतून कशीतरी सुटका केली आणि पोलिसांत धाव घेतली. जास्त नशेमुळे तरुणीची प्रकृती बिघडली असून तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी सात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पीडितेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार की, ती तिच्या मैत्रिणीच्या घरी जाण्यासाठी निघाली होती. त्यावेळी आरोपींनी तिचं अपहरण केलं. वाटेत तिला आरोपी अर्शद आणि असीम भेटले. त्यांनी तिच्या तोंडावर कापड फेकलं आणि तिला बेशुद्ध केलं. त्यानंतर दोघांनी त्याला मोटारसायकलवर बसवून अज्ञातस्थळी नेले. जिथे सात जणांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. आरोपींनी पीडितेला दारु पाजली आणि सात नराधमांनी तिच्यावर 20 दिवस सामूहिक अत्याचार केला.

आरोपींनी तिला वारंवार बेशुद्ध करून वेगवेगळ्या ठिकाणी तिच्यावर अत्याचार केला. आरोपींनी तिला 20 दिवस डांबून ठेवलं. जास्त नशेमुळे पीडितेची प्रकृती बिघडली यामुळे आरोपींनी तिला सोडून पळून गेले, यानंतर पीडिता पोलिसांकडे पोहोचली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी सात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.