मोठी बातमी : स्मिता वाघ, रक्षा खडसे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

जळगाव : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. अर्थात दुपारी ३ वाजेच्यापर्यंत अर्ज भरण्याची वेळ देण्यात आली आहे. महायुतीच्या जळगाव व रावेर मतदारसंघाच्या उमेदवार आज २५ रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित अर्ज दाखल करणार होते. परंतु, त्यांना उशीर होत असल्याने गैरसोय होऊ नये, म्हणून दोघा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.