मोदींनी देशाला समृद्ध बनवण्याचं काम केलं – अमित शाह

जळगाव : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला समृद्ध बनवण्याचं केलं आहे.  युवकांसाठी केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. इतरांना फक्त त्यांच्या मुलांची चिंता आहे, अर्थात सोनिया गांधी यांना खा. राहुल गांधी, शरद पवारांना मुलगी सुप्रिया सुळे, तर उद्धव ठाकरे यांना मुलगा आदित्य ठाकरे यांची चिंता आहे, असे म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी इंडिया आघाडीवर टीका केली. ते येथील सागर पार्क येथे आयोजित ‘युवा संवाद’ कार्यक्रमाला संबोधित करत आहेत.