राऊतांनी जिथे जिथे पाऊल ठेवेलेलं आहे,तिथे…काय म्हणाले नितेश राणे ?

मुंबई : भाजप आमदार नितेश राणेंनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे राणे म्हणाले कि, “संजय राजाराम राऊतांनी जिथे जिथे पाऊल ठेवेलेलं आहे एकतर ते घर तुटलंय किंवा पक्ष फुटला आहे. स्वत:च्या मालकाची अवस्था आज ना घर का ना घाट का अशी करुन टाकली आहे. पवार साहेबांचा चेला म्हणवून घेऊन त्यांची आज काय अवस्था केली हे उभा महाराष्ट्र पाहतो आहे. उद्धव ठाकरेंना आणि पवारांना संपवलं. त्यानंतर काँग्रेस उरली होती. त्या काँग्रसची काय अवस्था झाली आहे हे सर्वांनी पाहिलंच आहे. त्यामुळे मी पहिल्या दिवसापासून हेच सांगत आहे की, संजय राऊतांना कुणीही घरात किंवा पक्ष कार्यालयात घेऊ नये. कारण त्याचे परिणाम सातत्याने महाराष्ट्रात दिसत आहेत.”

“उद्धवजी, पवार साहेब आणि काँग्रेस संपल्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीकडे संजय राऊतांनी आपलं लक्ष वळवलेलं आहे. म्हणूनच मी प्रकाश आंबेडकरांना एवढंच सांगेन की, जे उद्धवजी, पवार साहेब आणि काँग्रेसला कळलं नाही ते तुम्हाला वेळेत कळलं तर तुमच्यासाठी चांगलं आहे. अन्यथा संजय राऊत तुमचीही अवस्था या तिघांसारखी करुन टाकेल. त्यामुळे यावर थोडं लक्ष द्या,” असे ते म्हणाले. मंगळवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.