राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा विभागात मेगाभरती, आजच करा अर्ज

राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व नागरी संरक्षण विभागअंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरु आहे. पुरवठा निरीक्षक व वरिष्ठ लिपिकपदांसाठी ही भरती होणार आहे. एकूण ३४५ जागा रिक्त असून यात जळगाव जिल्ह्यातील ९ पुरवठा निरीक्षकांची भरती होणार आहे, ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात आहे. लक्ष्यात असू अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२३ असल्याने शेवटचे पाच दिवस अर्ज करण्यासाठी राहिले असून उमेदवारांना लागलीच अर्ज करावा लागणार आहेत.

शैक्षणीक पात्रता :
पुरवठा निरीक्षक, गट-क- पदवीधर (अन्न व तंत्रज्ञान किंवा अन्न व विज्ञान पदवी असल्यास प्राधान्य)
वरिष्ठ लिपिक (गट-क) – पदवीधर

वयाची अट: 01 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ: 05 वर्षे सूट]
परीक्षा शुल्क : अराखीव: ₹1000/- [मागासवर्गीय/आदुघ/दिव्यांग/अनाथ:₹900/-, माजी सैनिक: फी नाही]

कुठे किती जागा
पुरवठा निरीक्षक (गट-क) आणि वरिष्ठ लिपिक (गट-क)लिपिकपदासाठी राज्यात सर्वाधिक जागा छत्रपती संभाजीनगर विभागात भरल्या जाणार आहेत असून त्या सोबत पुणे विभागात देखील जागांची संख्या चांगली आहे. कोकण (४७), पुणे (८२), नाशिक ४९), छत्रपती संभाजीनगर (८८), अमरावती (३५) व नागपूर (२३) असे आहे.

पदाचे नाव :
1) पुरवठा निरीक्षक (गट-क)
2) वरिष्ठ लिपिक (गट-क)