‘राज्यात कुणालाही..’ देवेंद्र फडणवीसांचा इशारा

मुंबई : अकोल्यानंतर शेगावमध्येही जोरदार राडा झाला. अहमदनगरमधील शेवगावमध्ये काल दोन गटांमध्ये दगडफेक झाली. छत्रपती संभाजी महाराज्यांच्या जयंतीनिमित्त शेवगाव शहरात मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीदरम्यान दगडफेक झाली. यामध्ये चार पोलीस जखमी झाले आहेत. या दोन घटनेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना मोठं वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस…
राज्यात काही लोक जाणून बुजून दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र महाराष्ट्रात कोणालाही दंगली घडवून देणार नाही आणि जे दंगली घडवण्याचा प्रयत्न करतात त्यांना अद्दल घडवणार,” असा गंभीर इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

आज पिंपरी चिंचवड शहरातील वेगवेगळ्या विकास कामाचं उद्घाटन उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत आहे. यावेळी माध्यमांशी बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील दंगली आणि 16 आमदारांच्या अपात्रेच्या प्रश्नावर माध्यमांशी बोलताना आपलं मत व्यक्त केले आहे.