रामराम भारतात नाही, मग पाकिस्तानात जाऊन करायचा का? : देवेंद्र फडणवीस

मुंबई : रामराम भारतात नाही, तर मग काय पाकिस्तानात जाऊन करायचे का? असा प्रश्न उपस्थित करीत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला. तुम्ही केलेले एकतरी विकासाचे काम दाखवा, असे आव्हानदेखील फडणवीसांनी दिले.

उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीच्या जाहीर सभेत बोलताना, पंतप्रधान नरेंद्र मोदींना मत म्हणजे विकासाला नव्हे तर, विनाशाला मत देणे होय. त्यामुळे जनतेने जागरुक राहावे. मोदी मतांसाठी राम-राम करीत फिरत आहेत, असे विधान केले होते. या विधानाचा खरपूस समाचार घेत उपमुख्यमंत्री फडणवीसांनी सोलापुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला