राहुल-सोनिया गांधी देश सोडून पळून जाणार: गिरिराजसिंह यांचा प्रचारसभेतून आरोप

राहुल गांधी आणि सोनिया गांधी या देशाबद्दल मुळीच प्रेम नाही. देशावासीयांची दिशाभूल करण्याचे काम काँग्रेसकडून सुरू आहे. यावेळी काँग्रेसला ४० पेक्षाही कमी जागा मिळतील. निवडणुकीनंतर त्यांच्या पक्षात नेतेच उरणार नाहीत, तर राहुल आणि सोनिया देश सोडून पळून जातील, असा हल्लाबोल भाजपा नेते गिरिराजसिंह यांनी बुधवारी प्रचारसभेतून केला.

भाजपा उमेदवार हर्ष मल्होत्रा यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेला संबोधित करताना सिंह म्हणाले, काँग्रेस पक्षाचे अस्तित्व संकटात आहे. येणाऱ्या पाच वर्षांत लोक या पक्षाला विसरून जातील. साठ वर्षांत काँग्रेसच्या नेत्यांनी देशाचा बट्टचाबोळ केला. सत्तेचा वापर केवळ आपलेकुटुंब व निकटवर्तीयांसाठी करण्यात आला. गरीब, आदिवासी, दुर्बल घटकाचा वापर केवळ मतासाठी करण्यात आला. गरिबी दूर करण्याच्या केवळ बाता करीत आहे.

जनतेने त्यांच्या आमिषाला बळी पडू नये. त्यांना देशाला इस्लामिक स्टेट बनवायचा आहे. जोपर्यंत भारतात सनातनचे बहुमत आहे, तोपर्यंत लोकशाहीला धक्का लागणार नाही, असा विश्वास सिंह यांनी यावेळी व्यक्त केला