---Advertisement---

लग्नाला झाले होते फक्त चार महिने, कंटाळून तिने घेतला टोकाचा निर्णय,

by team

---Advertisement---

भुसावळ ः लग्नाच्या अवघ्या साडेचार महिन्यानंतर सासरच्या मंडळींकडून छळ सुरू झाल्याने सुरत येथील माहेर व न्हावी, ता.यावल येथील सासर असलेल्या बिल्कीसबी आबीद शेख (24) या विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केली होती. याप्रकरणी पतीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर भुसावळ सत्र न्यायालयात खटल्याची सुनावणी झाली. या खटल्यात आरोपी पतीला सात वर्ष तर जेठाला तीन तर जेठाणीला दोन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा न्या.आर.एम.जाधव यांनी शुक्रवार, 13 ऑक्टोबर रोजी सुनावली.

न्हावी, ता.यावल येथील बिल्कीसबी आबीद शेख (24) या विवाहितेला विविध कारणावरून सासरच्या मंडळींनी त्रास दिल्याने तिने गळफास घेत आत्महत्या केली होती. 2017 मध्ये ही घटना घडली होती मात्र आरोपींनी मयताने शॉक लागल्याने तसेच बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याचा बनाव केला होता. मयताच्या भावाने याप्रकरणी तक्रार दिल्यानंतर मयताचा पती आबीद शेख तस्लीम पिंजारी (35), जेठ नजीम शेख तस्लीम पिंजारी (40) व जेठाणी रुकैयाबी नजीम पिंजारी (32) यांच्याविरोधात फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. भुसावळ सत्र न्यायालयात दोषारोपत्रदाखल झाल्यानंतर खटल्याची सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे एकूण नऊ साक्षीदार तपासण्यात आले. मयत विवाहितेचा भाऊ व इतर साक्षीदार तसेच तपासाधिकारी एम.जे.मोरे यांची साक्षी महत्त्वपूर्ण ठरली. पैरवी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक शेख रफिक शेख कालू होते. सरकार पक्षातर्फे सहाय्यक अभियोक्ता ॲड.प्रवीण भोंबे यांनी प्रभावी युक्तीवाद केला.

 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---