लव्ह जिहाद’विरोधी कायद्यासंदर्भात लवकरच निर्णय घेणार: मुख्यमंत्री

मुंबई : लव्ह जिहाद’विरोधी कायदा करण्याविषयी शासन अत्यंत गंभीर आहे. या कायद्यासंदर्भात राज्य शासनाने बर्‍याच गोष्टी केलेल्या आहेत. लवकरच या संदर्भात तुम्हाला निर्णय समजेल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवालव्ह जिहाद’विरोधी कायदा कर दिले.लव्ह जिहाद’च्या विरोधात महाराष्ट्रभरात काढण्यात आलेल्या विविध मोर्च्याच्या प्रतिनिधींसोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. या वेळी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री संजय राठोड, आमदार भरत गोगावले आणि प्रताप सरनाईक उपस्थित होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट यांनी सांगितले की, ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात आणि शहारात लाखोंच्या संख्येने ५० हून अधिक मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातही ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कठोर कायदा करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते; मात्र एक वर्ष उलटून गेले तरी तसा कायदा झालेला नाही. उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, मध्य प्रदेश, गुजरात आदी राज्यांनी ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कायदा केला आहे. महाराष्ट्रातही लवकर कायदा व्हावा, अशी मागणी शिष्टमंडळाची मागणी आहे.

या वेळी शासनाची भूमिका स्पष्ट करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सरकार कोणत्या विचारांचे आहे, हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे लव्ह जिहादसंदर्भात राज्य सरकारने एक-एक करून निर्णय घ्यायला प्रारंभ केला आहे. शासनाची भूमिका काय आहे, हे आम्ही प्रतापगडावरील कृतीने दाखवून दिले आहे. त्यामुळे शासन तुमच्या भूमिकेशी पूर्णपणे सहमत आहे. या कायद्याविषयी शासनाने काय केले, यासाठी मुंबईला एक ठराविक लोकांची बैठक ठेवून त्यामध्ये तुम्हाला माहिती दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.