वरुणराजा खान्देशात परतला; जिल्ह्यात एकूण सरासरीच्या ७२ टक्के पाऊस

तरुण भारत लाईव्ह। १२ सप्टेंबर २०२३। ऑगस्ट महिन्यात पाठ फिरवलेल्या पावसाने सप्टेंबर महिन्यात जोरदार पुनरागमन केले जळगाव जिल्ह्यात केवळ चार दिवसातच १०९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. खानदेशात एकूण सरासरीच्या तुलनेत जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक 72 टक्के पावसाचे नोंद  झाली. त्यामुळे आगामी काही दिवस पावसाचा जोर कायम राहिला तर जळगाव जिल्ह्यात सरासरी इतका पाऊस होण्याची शक्यता आहे.

खानदेशातील धुळे जळगाव व नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यांमध्ये पावसाचे आगमन झाले आहे. मात्र आगामी काही दिवस खानदेशात ढगाळ वातावरण कायम राहू शकते मात्र पावसाचा वेग कमीच राहण्याची शक्यता आहे. 17 सप्टेंबर नंतर काही प्रमाणात पुन्हा पावसाचे आगमन होऊ शकते गेल्या चार ते पाच दिवसात झालेल्या पावसामुळे त्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे जळगाव जिल्हा सह राज्यात पाऊस परतला आहे. सध्या स्थिती हे क्षेत्र मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरेकडे सरकल्याने 14 सप्टेंबर पर्यंत पावसाचा जोर कमी होऊ शकतो 14 ते 15 सप्टेंबर नंतर पुन्हा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र विकसित होणार आहे. यामुळे खानदेशात पुन्हा 17 सप्टेंबर नंतर पाऊस होऊ शकतो. हवेचा दाब अधिक वाढला तर पावसाचा जोर जास्त राहील मात्र सध्या स्थितीत हवेचा दाब नाशिक नगर भागाकडे असून अधिक असू शकतो. त्यामुळे जळगाव सह धुळे नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते हलका पाऊस होऊ शकतो. त्यानंतर परतीचा पाऊस झाला तर काही प्रमाणात पावसाची तूट भरून निघू शकते.

जळगाव जिल्ह्यात जून महिन्यात 45 मिमी ऑगस्ट महिन्यात पाऊस झाला होता. या दोन्ही महिन्यात मिळून 93 मिमी पाऊस झाला होता. त्यातून सहा ते नऊ सप्टेंबर दरम्यान चार दिवसातच जळगाव जिल्ह्यात 109 मिमी पाऊस झाला आहे. म्हणजे जून व ऑगस्ट या दोन महिन्याचा पाऊस केवळ चार दिवसातच झाला आहे. दरम्यान गेल्या चार वर्षांपासून जळगाव जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक पाऊस झाला होता यंदा देखील हे चित्र पाहायला मिळत असून सप्टेंबर महिन्यातील एकूण पावसाची १२३ मिमी इतकी सरासरी आहे 9 सप्टेंबर पर्यंत जिल्ह्यात 109 मीमी पाऊस झाला आहे. त्यामुळे अजून काही दिवस या सरासरीत वाढ होऊ शकते.