विवेकानंद प्रतिष्ठान कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल लागला १०० टक्के ; यशाची परंपरा कायम

जळगाव : नाशिक बोर्डाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेत विवेकानंद प्रतिष्ठान कनिष्ठ महाविद्यालयाचा  निकाल १०० टक्के लागला आहे. महाविद्यालयातून विनय किशोर पाटील याने ८९.६७ टक्के गुण मिळवत पहिला क्रमांक पटकाविला आहे. श्रेयस पालोड ८५.६७ याने दुसरा क्रमांक, मयूर सैठवाल ८५ टक्के  तिसरा क्रमांक, विवेक सुतार ८२.१७ टक्के चौथा क्रमांक तर विनायक सुतार ८१.३३ टक्के याने पाचवा क्रमांक प्राप्त केलाआहे.  विद्यार्थ्यांच्या यशासाठी विवेकानंद प्रतिष्ठानच्या अध्यक्षा शोभा पाटील, सचिव रत्नाकर गोरे, हेमाताई अमळकर, महाविद्यालयाचे अध्यक्ष विनोद पाटील प्रशासकीय अधिकारी दिनेश ठाकरे, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर पाठक, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य  ज्ञानेश्वर वाघ व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.