शिंदे फडणवीस सरकारकडून मनोज जरांगे यांच्या ‘या’ मागण्या मान्य

मुंबई: मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटीतहुन मुंबईत धडक दिलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या काही मागण्या सरकारकडून मान्य करण्यात आल्या आहेत. कुणबी नोंदी शोधण्यासाठी नेमण्याता आलेली समितीला मुदतवाढ देण्यात येणार आहे. मनोज जरांगे यांनी वर्षभर वाढवण्यासाठी मागणी केली होती. मात्र, सरकारने टप्प्याटप्प्याने मुदतवाढ देण्यात येईल, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले.

मनोज जरांगे यांनी सापडलेल्या नोंदी ग्रामपंचायतीवर लावा, अशी मागणी जरांगे यांनी केली. त्यामुळे प्रमाणपत्रासाठी शिबिरे सुरु केली असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. नोंदी मिळालेल्या परिवाराला प्रमाणपत्र मिळाले पाहिजे, अशीही मागणी त्यांनी केली. 54 लाख जणांना प्रमाणपत्र द्या. एका नोंदीत 50 ते 150 जणांना लाभ होईल त्यातून दोन ते अडीच कोटी समाज आरक्षणात येईल, असे त्यांनी सांगितले.

मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटीसह राज्यातील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली होती. सरकारकडून ही मागणी मान्य करण्यात आली आहे. मात्र, त्यांनी सोबतच पत्र देण्याची मागणी केली आहे.त्याचबरोबर मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटीसह राज्यातील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली होती. सरकारकडून ही मागणी मान्य करण्यात आली आहे. मात्र, त्यांनी सोबतच पत्र देण्याची मागणी केली आहे.